Wednesday, June 7, 2017

#इच्छामरणाचाअधिकार

जगाची लोकसंख्या आता ८०० कोटींच्या आकड्याकडे वाटचाल करत आहे. भारताचीही १५० कोटींच्या आकड्याकडे दमदार वाटचाल सुरू आहे. पण यो दोन्ही गोष्टींचा अभिमान बाळगण्याऐवजी छातीत धडकी भरावी असं हे वास्तव आहे. इतकी मोठी लोकसंख्या पोसणं ही पृथ्वीची क्षमता नाही. आपला देशही त्याला अपवाद नाही. ही इतकी प्रचंड लोकसंख्या असण्याला आपले काही मूर्ख विचारच जबाबदार आहेत. मनुष्य प्राण्याला दिलं जाणारं अवास्तव महत्त्व आणि त्याचं जगणं ही जणू जगातली एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे अशा पद्धतीनं मानवी जगण्याचा अकारण केला जाणारा गौरव. त्यांतून माणसाला नाकारण्यात आलेला मृत्युचा अधिकार आणि तो गुन्हा मानण्यात येणं. हा भंपक आणि अव्यवहारी निर्णय बदलण्यात आला नाही तर आपला देश आणि ही पृथ्वीही लवकरच नष्ट होईल आणि तीही अतिशय घृणास्पद रितीनं. स्टिफन हॉकिंग हा शास्त्रज्ञ पृथ्वीला केवळ शंभर वर्षे देतोय. या शंभर वर्षांत माणसानं राहण्याची नवी जागा शोधली नाही तर ही पृथ्वी या माणसांच्या वजनाखाली चिरडून जाईल. मानवी जात नष्ट होईल. हे काही भाकित नाही. हे एक अटळ असं सत्य आहे ज्याकडे सारेच दूर्लक्ष करत आहेत. मग त्याला धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक किंवा मानवीय अशी कोणतीही कारणं असोत. हे दूर्लक्ष होत आहे हे सत्य आहे आणि ते आपल्याला शेवटी उध्वस्त करणार हेही तितकंच सत्य आहे. यांतून वाचण्यासाठी अनेक उपाय करावे लागतील. ज्यात जन्मदरावर नियंत्रण हा एक महत्त्वाचा उपाय आहे तसाच मृत्युदर वाढवण्याचाही उपाय असायला हवा. आपण काही प्रमाणात जन्मदरावर नियंत्रण ठेवत आहोतच. पण मृत्युदर वाढवण्याकडे मात्र आपण जाणूनबुजून दूर्लक्ष करत आहोत. हे साहजिकच आहे कारण एकदा जन्माला आल्यानंतर कोणी मरायला सहसा तयार होत नाही. ज्यांना मरायचं असतं अशांना कायदा, धर्म, मानवतावाद आडवा येतो. त्यामुळे इच्छा असूनही लाखो लोक मरण्यासाठी तळमळत जगत राहतात. ही परिस्थिती आता बदलायला हवीच. 
माणूस हा मर्त्य आहे. तो वृद्ध होत असतो. जीवंत असेपर्यंत तो काही कायम अजर अमर नसतो. त्यामुळे कोणालाही कधीही कोणतीही व्याधी होऊन, अपघात होऊन तो लुळापांगळा होतो किंवा त्याला काही झालं नाही तर मग त्याचं वाढतं वय त्याला अशक्त करत जातं. माणसानं सन्मानानं जगावं त्यातच त्याचं मोठेपण आहे. पण ते होत नाही. खरंतर प्राचीन संस्कृतीत माणसानं ही गोष्ट ओळखली होती आणि त्याप्रमाणे आपल्या जगण्याचे विभाग करून ते त्यानुसार जगत होते. भारतात आढळणारी चार आश्रमांची संकल्पना हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. वय झाल्यावर संसारातून अंग काढून घ्यावं आणि मरणाची तयारी करावी हा याचा हेतू होता. पण आपण हा हेतू आता आपल्या स्वार्थापायी विसरलो आहोत. वैद्यक शास्त्र, औषधशास्त्र यांच्या प्रगतीमुळे मानवी जीवन सुकर झालं आहे. पैसा असल्यानं राहणीमानही चांगलं झालं आहे. परिणामी आपली आयुष्यं लांबली आहेत. पण ही लांबलेली आयुष्य महत्वाची आहेत का, त्याला काही अर्थ आहे का याचा कोणी विचार करत नाही. लोक नुस्तेच जगत राहतात. आपल्याला त्रास होतोय व आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतोय याची कोणती जाणीवच लोकांमध्ये उरलेली नाही. नात्यांच्या दबावाखाली, समाजाच्या दबावाखाली, भावनांच्या दबावाखाली माणसं जगत राहतात, इतरांना जगवत राहतात. याचे रोजचे परिणाम मात्र भीषण असतात. याचे दूरगामी परिणाम तर विचारायलाच नको. माणसं जितकी जास्त तितका व्यवस्था, यंत्रणांवरचा ताण वाढत जातो. नवीन लोकांना कमी संधी उपलब्ध होतात. देशाचा पाया डळमळीत होत जातो.
हे टाळायचं असेल तर आपल्याला मृत्युदर वाढवण्याचा विचार करावा लागेल. जन्माचं प्रमाण आणि मृत्युचं प्रमाण यांचा समतोल राखावा लागेल. सध्या जन्मदर जास्त आणि मृत्युदर कमी आहे ज्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यासाठी इच्छामरण हा एक उपाय आहे. कायद्यानं याची परवानगी मिळायला हवीच. पण ती मिळत नाही म्हणून जगत राहायचं असंही नाही. मृत्यु हे वरदान आहे आणि ते आपल्या हातांत आहे. मृत्यु नसताच तर काय परिस्थिती ओढवली असती याचा विचारही अंगाला शहारे आणतो. तेव्हा मृत्यु अशुभ, वाईट, भीतिदायक, घृणास्पद आहे ही भावना मनातून काढून टाका. मृत्युचं स्वागत करायला शिका. त्याचा विचार करा. सतत विचार करा. डोळसपणे व्यवहार लक्षात घेऊन विचार करा. स्वार्थ बाजूला ठेऊन विचार करा. इतरांचा विचार करून याचा विचार करा. कधीतरी आपण या जगाचं देणं लागतोय या भावनेतून विचार करा. आपल्या जीवंत असण्याची आपल्याला खरंच गरज आहे का याचा विचार करा. आपल्या असण्यानं आपलं, कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं काही भलं होतंय का याचा विचार करा. ते जर होत नसेल, आपल्यामुळे आपल्या स्वतःलाच त्रास होत असेल, त्यात सुधारही होत नसेल, त्यामुळे आपल्यावर आणि कुटुंबावर भार पडत असेल, आपल्यामुळे इतरांचं जगणं विस्कळीत होत असेल तर आपण का जगायचं याचा नक्की विचार करा.
हे कदाचित सारं वाचताना शहारे येतील अंगावर, भीति वाटेल, राग येईल, पण तरीही याचा विचार करा. तुम्ही तरुण असाल तर हीच योग्य वेळ आहे यावर विचार करण्याची कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्याचीही तरतुद करता येईल. तुम्ही वृद्ध असाल तर हीच योग्य वेळ आहे यावर निर्णय घेण्याची. पूर्ण समाधानानं आयुष्याचा निरोप घेणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. एखाद्या योग्यालाही ते शक्य होत नाही सहसा. जगण्याच मोह हा असा जबरदस्त असतो. पण भावनांपेक्षा जिथं व्यवहार बघणं गरजेचं असतं अशी ही एक गोष्ट आहे. हे कदाचित आत्ता वाचताना पटणार नाही पण निदान त्यावर विचार करणं तरी सुरू करा. जीवंतपणी तुम्ही कोणाला नकोसं होणं, तुम्हाला इतरांच्या जगण्याचा तिरस्कार करावा लागणं या दोन्ही गोष्टी अत्यंत वाईट असतात. तशी वेळ येण्याआधीच आनंदानं, समाधानानं आयुष्याचा पूर्णविराम करण्याची संधी साधणं हे एक काम जरी केलं तरी आपल्या जगण्याचं सार्थक होईल.

यावर निदान आपण चर्चा तरी सुरू करुयात. 

No comments:

Post a Comment